'येऊ कशी कशी मी नांदायला' मालिका वेळोवेळी प्रेक्षकांकडून ट्रोल केली गेली. पण मालिकेचा चाहतावर्ग खूपच मोठा आहे. त्यामुळे सर्वच प्रेक्षकांनी मालिकेला भरभरून प्रेम दिलं.
या मालिकेत ओमच्या आईची भूमिका साकारणारी शकू म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले मालिके चा निरोप घेणार असल्याचे समजले आहे. मालिका सोडण्याचा नेमकं कारण काय हे अजून कळाले नाही. त्याऐवजी आपणास एक सुप्रसिद्ध अभिनेत्री भेटीस येणार आहे. ओमची आई शकू म्हणजेच शुभांगी यांनी खूप मनापासून काम केलं. त्यामुळे त्यांचा चाहता वर्गही खूप वाढला आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात त्यांना सर्वोत्कृष्ट सासुबाई असा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. पण काही कारणास्तव त्यांना ही मालिका सोडावी लागत आहे. त्याऐवजी अभिनेत्री किशोरी अंबिये मालिकेत दिसणार आहेत.
मालिका सोडण्याचं नेमके कारण काय?
शुभांगी गोखले यांनी मालिकेचा निरोप घेण्यामागील खरं कारण स्पष्ट झालं नसलं तरी या मालिकेच्या कथेचा खालावलेला दर्जा आणि त्यांच्यावर चित्रित होणारा कमी भाग यामुळे त्यांनी ही मालिका सोडल्याचं कारण दिले जात आहे . 'राजा राणीची गं जोडी' या मालिकेत देखील शुभांगी यांची गरज असल्याने त्यांनी हा निर्णय घेतलं असावं.


