आज मुंबईमध्ये वांद्रे-वरळी सी लिंकवर पहाटे ३ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.
या अपघातामध्ये 4 कार आणि रुग्णवाहिका यांच्यात धडक झाली असून यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 10 जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अपघातात जखमी झालेल्यावर सध्या उपचार सुरु असून पंतप्रधान कार्यालयाकडून या अपघातावर दुःख व्यक्त करण्यात आले आहे.
सुरवातीस दोन कारचा अपघात होता त्यातील जखमींना दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलाविण्यात आली होती.
त्यावेळी जखमींना ॲम्बुलन्समध्ये हालवत असताना इतर गाड्या वेगामध्ये आल्या आणि धडकल्या आहेत अशी माहिती मिळत आहे.


