नुकताच T-20 विश्वचषक सामने सुरू झाले आहेत. भारताची टीम जोमाने तयारी करत आहे. पण काही अडचणीमुळे भारताच्या टीमला डोकेदुखी झाले आहे ,असे समजले.
पाहूया नक्की कारण काय आहे?
भारताच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या संघात सर्वात जास्त खेळाडू हे मुंबई इंडियन्सचे आहेत. रोहित शर्मा, इशान किशन, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादवसारखे एकामागून एक धडाकेबाज फलंदाज भारतीय संघात आहेत. पण त्यांच्यामुळेच आता भारतीय संघाची डोकेदुखी वाढेलली आहे. कारण पहिल्या सराव सामन्यात इशान किशनने सलामीला येत ७० धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती.
पण आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मात्र भारतीय संघाने रोहित शर्माला लोकेश राहुलबरोबर सलामीला पाठवायचे ठरवले आहे. त्यामुळे आता इशान किश़नचे काय करायचे, हा मोठा प्रश्न संघापुढे ठेपला आहे. कारण इशानने दमदार खेळी साकारत आपली कामगरी सिद्ध केली आहे, त्यामुळे त्याला संघातून कडाता येेणार नाही. राहुल जर सलामीला येणार असतील तर इशानला तिसऱ्या क्रमांकावर पाठवता येऊ शकते, पण ही जागा कर्णधार विराट कोहलीची आहे आणि तो आपली जागा सोडणार नाही.
त्यामुळे आता इशानला जर संधी द्यायचं असेल तर त्याला मधल्या फळीत खेळवावे लागेल. पण मध्यला फळीत आधीपासून सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या हे दोघे खेळत आहेत. त्यामुळे इशानला जर मधल्या फळीत खेळवायचे असेल तर सूर्यकुमार आणि इशान यांच्यामध्ये कोणाला संघाबाहेर काढायचे, हा प्रश्न भारतीय संघाला सोडवावा लागेल.
सध्याच्या घडीला हार्दिक हा फक्त फलंदाज म्हणून संघात आहे, कारण तो गोलंदाजी करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जर फलंदाज म्हणून सूर्यकुमार आणि हार्दिक यांचा विचार करावा लागले. सूर्यकुमार हा सातत्याने एक फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करत आहे, तर इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात हार्दिकने चांगली फलंदाजी केली होती. त्यामुळे या दोघांपैकी कोणाला संघाबाहेर काढायचे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या या फलंदाजांमुळे भारतीय संघ आणि कर्णधार विराट कोहलीची डोकेदुखी वाढलेली असेल.


