अनिरुद्ध आणि अरुंधती च्या घटस्फोटानंतर संजना लग्न करून घरात आली. संजनाच्या हेकेखोर स्वभावामुळे आई -अप्पांना तर तिचा कंटाळा आला आहे. अरुंधती नेहमीप्रमाणे नम्र आणि समजूतदार असल्याने तिने जरी घर सोडून गेली असली तरी तिचे वर्चस्व असून देशमुख कुटुंबामध्ये तसेच टिकून आहे. अविनाश भाऊजींना पैशांची गरज असल्याने अरुंधती तिच्या नावावर असलेला समृद्धी तील हिस्सा तारण ठेवून पैसे उभे केले. पण ही गोष्ट संजनाला कळताच तिने घरात तमाशा करून अरुंधतीला सर्वांसमोर खरे बोलण्यास भाग पाडले.
पण मालिकेत आता एक नवीन ट्विस्ट येणार आहे. संजना आता अनिरुद्ध ला एक नवीन आयडिया देऊन आई आप्पांची साथ सोडण्यास सांगत आहे. म्हणजेच संजना आणि अनिरुद्ध त्यांच्या वाटेला आलेला समृद्धी तून हिस्सा विकून ते घराबाहेर पडणार आहे. अनिरुद्ध आई आप्पांना एकटे सोडून निघून जाणार आहे. पुढे काय होईल ते आपल्याला येणाऱ्या भागात कळणार आहे.


