यामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अल्प वेळेसाठी लघु भारनियमन सुरू झाले आहे, तर दीर्घ काळासाठी चे भारनियमन होऊ नये यासाठी प्रयत्न चालू आहे.
सुमारे 2 हजार 500 मेगावॅटची खरेदी
तर सुत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार, बाजारामधून सुमारे 2 हजार पाचशे मेगावॅट विजेची खरेदी सुरू असून या सणासुदीच्या दिवसांमध्ये भारनियमन होणार नसल्याचे सांगितले आहे. तर जलविद्युत आणि अन्य स्त्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे हे प्रयत्न सुरू असल्याचीही माहिती मिळत आहे.
वाचा:
कोळशाच्या खाणीत परिसरांमध्ये सुरू असलेली अतिवृष्टी काही काळ थांबल्यामुळे कोळसा उत्खनन पुन्हा सुरू होण्याची राज्य सरकारला अपेक्षा आहे आणि असे जर झाले तर हे विजेचे संकट टळणार आहे. देशभरामध्ये कोळसा टंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीज निर्मिती कमी प्रमाणात होत आहे.
वाचा:
असाच महत्त्वाच्या अपडेट साठी जीवन मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.


